कोपरगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठमध्ये विकासकामांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना मतदारांचा स्पष्ट कौल मिळताना दिसत आहे. आमदार आशुतोष दादा काळे यांच्या माध्यमातून प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची थेट पावती म्हणून विमल भगवान मरसाळे व इम्तियाज रफिक अत्तार यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक आठमध्ये रस्ते, गटार व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरी सुविधा यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ठोस कामे करण्यात आली आहेत. ही कामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात दिसून आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या विकासकामांमध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांची भक्कम साथ आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
विमल भगवान मरसाळे व इम्तियाज रफिक अत्तार यांनीही नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे हे दोन्ही उमेदवार केवळ नावापुरते प्रतिनिधी न राहता प्रत्यक्ष काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागात ओळखले जात आहेत.
एकूणच प्रभाग क्रमांक आठमध्ये “विकासाला मत” देण्याची मानसिकता ठळकपणे दिसून येत असून, आमदार आशुतोष दादा काळे यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास ठेवत नागरिक विमल भगवान मरसाळे व इम्तियाज रफिक अत्तार यांना विकासाची पावती देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.



